ठाण्यात आज सकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली. कालपासूनच ठाण्यात ढगाळ वातावरण होतं आणि उकाड्यातही प्रचंड वाढ झाली होती. आज सकाळीच ढगांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे सकाळी कामावर जाणा-या नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे वातावरणात थोडा गारवा आला असला तरी हवामानाच्या या बदलामुळे ताप सर्दी खोकला अशा विकारांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.