ठाण्यात अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने श्रावणरंग

ठाण्यात अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने श्रावणरंग हे निमंत्रित कवींचे कविसंमेलन उद्या सायंकाळी बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे आयोजित करण्यात आले आहे. महापौर नरेश म्हस्के हे या कार्यक्रमास विशेष आतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध गजलकार ए.के.शेख हे या काव्यमैफिलीच्या अध्यक्षस्थानी असून कवी, गजलकर संदीप माळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कवि संमेलनामध्ये कवी दुर्गेश सोनार, गीतेश शिंदे, प्रथमेश पाठक, संकेत म्हात्रे, आदित्य दवणे, निकिता भागवत, विजयराज बोधनकर, रामदास खरे, जितेंद्र लाड आणि वृषाली विनायक हे निमंत्रित कवीं आपली कविता सादर करणार आहेत. कोरोनाच्या भयभीत वातावरणानंतर पहिल्यांदाच रसिकांना एक सुंदर काव्य मेजवानी मिळणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading