ठाण्यातील विविध खाड्यांवर १७ सप्टेंबरला सफाई मोहिम

केंद्र सरकारच्या मिनिस्टरी ऑफ अर्थ सायन्स विभागाकडून जागतिक सागरी किनारा स्वछता दिनानिमित्त ठाण्यातील विविध खाड़ी किनाऱ्यावर जमा होणारे कचरा साफ करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी सफाई मोहिम राबविण्यात येणार आहे. मानव निर्मित कचऱ्याने समुद्राचे पाणी प्रदूषित होत असून ठाण्यातील खाड़ी किनारेदेखील काही अंशी जबाबदार आहेत. त्यामुळे ठाण्यातील विविध सामाजिक संघटना एकत्र येत १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता स्वछता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार गायमुख खाड़ी किनारा वसुंधरा संजीवनी मंडल आणि भारत विकास परिषद मार्फत सफाई करण्यात येणार आहे. कोलशेत खाड़ी किनारा समर्थ भारत व्यासपीठ आणि रोटरी क्लब, रोट्रैक क्लब यांच्यावतीने सफाई मोहिम राबवण्यात येणार आहे. चेंदणी कोळीवाड़ा (केअर फॉर नेचर फाउंडेशन आणि कोळी जमात ट्रस्ट), महागिरी खाड़ी (पर्यावरण दक्षता मंच, बी एन महाविद्यालय, एनएसएस विद्यार्थी), पारसिक खाड़ी ( पारसिक हिल प्लांटेशन आणि एंटी प्लास्टिक ब्रिग्रेड ) यांच्यावतीने किनारा सफाई मोहिम राबविण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading