ठाण्यातील चिरागनगर येथील एका घरात मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. आज सकाळच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे आलेल्या तक्रारीवरून चिरागनगर बौध्द विहाराजवळील साईकृपा चाळीमध्ये सारिका चव्हाण या ३० वर्षीय महिलेने घरामध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली होती. ह्या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मदतकार्य केलं आणि या महिलेचा मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.