ठाण्यातील काही भागाचा पाणी पुरवठा उद्या २४ तास बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या बारवी गुरूत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतल्यामुळे उद्या दुपारी १२ वाजल्यापासून शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे ठाणे महापालिका आणि वागळे औद्योगिक क्षेत्राचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसंच पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबानं पाणी पुरवठा होईल असं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून कळवण्यात आलं आहे.