ठाण्यातील एका शिक्षिकेचा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून गौरव करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचं आर्थिक गणित न जुळवता शिक्षणासाठी नवीन संशोधन करणा-या ठाण्यातील रूही सय्यद या शिक्षिकेचा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं गौरव केला आहे. कोणत्याही प्रकारची भांडवली गुंतवणूक न करता शिक्षणामध्ये नवनवीन प्रयोग करणा-या शिक्षकांचा दरवर्षी गौरव केला जातो. यासाठी राज्यातील ४ हजार शिक्षकांनी आपले प्रकल्प केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या झिरो इन्व्हेस्टमेंट इनोव्हेशन फॉर एज्युकेशनल इनिशिटिव्हज् या अभियानात सादर केले होते. यापैकी राज्यातील १० शिक्षकांच्या प्रयोगांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये रूही सय्यद यांचा समावेश आहे. अलिकडेच एका कार्यक्रमात रूही सय्यद यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या प्रयोगाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेही त्यांचा खास सत्कार करण्यात आला.