मुंबई प्रमाणेच ठाण्यातही रस्त्यावर फिरताना चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे. पोलिस आयुक्तांनी मास्क लावणे बंधनकारक केले असून चेहऱ्यावर मास्क नसल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.करोना विषाणु चा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मास्क बंधनकारक करण्यात आला आहे.करोना विषाणू संसर्गजन्य असल्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी ही उपाय योजना करण्यात आली आहे.मुंबईमध्ये तर मास्क नसेल तर अटक करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाण्यात मास्क नसल्यास कारवाई होणार आहे.