ठाण्याचा पाणी पुरवठा अचानक बंद झाल्यानं ठाणेकरांचे हाल

ठाणे शहराचा पाणी पुरवठा काल अचानक बंद झाल्यानं ठाणेकरांचे चांगलेच हाल झाले. अचानक पाणी पुरवठा ठप्प झाल्यानं ठाणेकरांची पाण्यासाठी पळापळ झाली. विविध ठिकाणी असलेल्या कूपनलिकांवर ठाणेकरांची गर्दी झाल्याचं चित्र पहायला मिळत होतं. ठाणे महापालिकेच्या पिसे येथील अशुध्द जलशुध्दीकरण केंद्रात पाणी पुरवठा करणा-या मुख्य जलवाहिनीवरील दुरूस्तीचं काम सुरू असल्यानं शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. यामुळं घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, सिध्देश्वर, श्रीनगर, लोकमान्यनगर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा आणि कळव्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद होता. मात्र ज्या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई महापालिका पाणी पुरवठा करते त्या परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत सुरू होता. ठाणेकरांना पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची कल्पना नसल्यामुळं ठाणेकरांचे चांगलेच हाल झाले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading