ठाणे स्थानकात नव्याने होणाऱ्या पादचारी पुलावर गर्डर लॉन्चिंग-खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश

ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रवाशांना पादचारी पूल अपुरे पडत आहेत. खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकात कल्याण आणि मुंबई विशेष असलेले ६० वर्षांपूर्वीचे जुने पादचारी पुल आयआयटीने दिलेल्या अहवालानुसार धोकादायक असल्याने रेल्वेने हे पूल पाडून घेतले. हे पब्लिक पादचारी पुल महापालिकेने पूर्व व पश्चिम मार्गात जोडणारे असल्याने पुलासाठी ठाणे महापालिकेने निधी द्यावा अशी रेल्वेने मागणी केली होती. खासदार राजन विचारे यांनी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे या पुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे ठाणे महापालिकेने ठाणे रेल्वे स्थानकात कल्याण आणि मुंबई दिशेला तसेच पारसिक बोगद्या जवळ असे तीन पब्लिक पादचारी पुलासाठी २७ कोटी मंजूर केले. त्यापैकी ८ कोटी रुपये रेल्वेला देण्यात आले होते. रेल्वेने ठाणे रेल्वे स्थानकात कल्याण आणि मुंबई दिशेला प्रत्येक फलाटावर पिलेर उभे करून निधी अभावी २ वर्ष काम थांबले होते. खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकात एलफिस्टन रोड येथे घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पुलाचे काम तातडीने मार्गी लावावे यासाठी रेल्वे प्रशासन आणि ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पाठपुरावा करून अपुरा पडलेला ४ कोटी निधी वर्ग करून घेतला. त्यातून पुलाच्या गर्डर चे काम सुरू झाले असून मध्यरात्री २ वाजता गर्डर टाकण्यात आले. ठाणे महानगरपालिका स्मार्ट सिटी मध्ये समावेश असल्याने या कामाचाही समावेश स्मार्ट सिटी मध्ये करण्यात यावा असे मध्य रेल्वेने ठाणे महापालिकेस कळवले आहे. त्यानुसार निधी वर्ग केल्यास येत्या दोन महिन्यात या पादचारी पुलाचे काम मार्गी लागेल असे विश्वास रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading