ठाणे शहराला पुढील दोन दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार

ठाणे शहराला पुढील दोन दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे.
ठाणे शहरास पाणी पुरवठा करणा-या भातसा धरणाच्या पाणी सोडण्याच्या दरवाजांवर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने धरणातून होणारा पाणीपुरवठा ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून पिसे बंधारा येथील पाण्याची पातळी कमी होणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस ठाणे शहरातील पाणी पुरवठा कमी दाबाने आणि अपुरा होईल. या तांत्रिक बिघाड दुरूस्तीनंतर पाणी पुरवठा सुरुळीत होईल. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading