ठाणे महापालिकेला मुंबई महापालिकेकडून प्रक्रिया केलेले अतिरिक्त २० दशलक्ष लिटर शुद्ध पाणी प्रतिदिन उपलब्ध करून द्यावे अशी अनेक वर्षांपासूनची असलेली मागणी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली. यामुळे वागळे इस्टेट परिसरातील कोपरी, आनंदनगर, किसननगर, भटवाडी आणि दिवा परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. आज झालेल्या बैठकीत वागळे इस्टेट विभाग- ११ दशलक्ष लिटर प्रतिदिन, कोपरी आनंद नगर विभाग ६ दशलक्ष लिटर, किसननगर २ दशलक्ष लिटर, भटवाडी १ दशलक्ष लिटर असा एकूण २० एम एलडी अतिरिक्त शुद्ध पाण्याचा आणि दिवा परिसराला ६.५० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा करण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून असलेली अतिरिक्त पाण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे पूर्ण झाली आहे.