ठाणे महापालिका क्षेत्रात रूग्ण वाढण्याचं प्रमाण लक्षणीय असलं तरी रूग्ण दगावण्याचं प्रमाण हे केंद्र आणि राज्याच्या तुलनेत कमी असल्याचा दावा महापालिका आयुक्तांनी केला आहे. काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला. तसंच महापालिका क्षेत्रात रूग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असून ते आता ४६ टक्क्यांवर आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाबाबतचे नियम शिथील करताना नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंग पाळणं अत्यंत गरजेचं असून वृध्द आणि १० वर्षाखालील मुलांनी घरीच रहावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. शहरात ८८ अॅम्ब्युलन्स उपलब्ध असून झोपडपट्टी भागात ५० फिव्हर क्लिनिक सुरू करून एक हजार जणांची टीम घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याचं काम करत आहे. तसंच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची सफाईही योग्य पध्दतीने सुरू असून आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याचा विश्वास पालिका आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.