ठाणे आणि उल्हासनगरच्या महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ

ठाणे आणि उल्हासनगरच्या महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार होता. महापौर पदासाठी किमान २ महिने आरक्षण काढणे अपेक्षित होते. मात्र आता अवघा महिन्याहून कमी कालावधी शिल्लक असतानाही आरक्षणाबाबत निर्णय झालेला नाही. पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता आरक्षण काढलं जाणं शक्य नाही. विधानसभा निवडणुकीनंतरच आरक्षणाचा निर्णय होणार असल्यामुळं या दोन्ही महापौरांना मुदतवाढ मिळणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading