ठाणेकर थंडीने गारठले

गेले काही दिवस थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून आजही ठाणेकर हवेतील गारठ्याने गारठून गेल्याचं दिसत होतं. आणखी काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचं वेधशाळेकडून सांगितलं जात आहे. ठाण्यामध्ये सकाळच्या वेळी तापमानाचा काटा १५ अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरत असून दुपारच्या सुमारास तो २८ ते ३० अंश सेल्सिअस पर्यंत वर चढत आहे. आज तर हवेत कमालीचा गारठा असून अगदी दुपारीही हवेतील गारवा अंगाला जाणवत होता. या थंडीमुळे तब्येतीच्या तक्रारीतही वाढ झाल्याचं दिसत आहे. अनेक जण सर्दी, खोकला आणि तापाच्या विकाराने त्रस्त आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading