कल्याणातील दुर्गाडी किल्ल्यावर दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी घंटानाद आंदोलन शिवसेनेतर्फे छेडलं जात. सेनेत फूट पडल्याने यावर्षी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून हे आंदोलन केले गेले. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आधी शिंदे गटाचं आंदोलन झालं. तोपर्यंत पोलीसांनी ठाकरे गटाला थांबवून ठेवलं होतं. या दरम्यान ठाकरे आणि शिंदे गट समोरासमोर आले. उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. शिंदे गटाचं आंदोलन झाल्यानंतर ठाकरे गटाचं आंदोलन झालं. मात्र, ठाकरे गट आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची चर्चा होती. मात्र दोन गट आणि संवेदनशील विषय असल्यामुळे पोलीसांची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळाली.