ठराविक रेल्वे स्थानकांच्या फलाट तिकिटामध्ये पाचपट वाढ

मध्य रेल्वेनं काही ठराविक रेल्वे स्थानकांच्या फलाट तिकिटामध्ये पाचपट वाढ केली आहे. रेल्वेतून अनावश्यक होणारा प्रवास टाळण्यासाठी रेल्वेनं कमी अंतराच्या तिकिट दरामध्ये वाढ केली होती. त्यानंतर फलाटावर होणारी गर्दी टाळण्यासाठी फलाट तिकिटांच्या दरात मोठी वाढ केली आहे. पूर्वी फलाट तिकिट १० रूपयाला मिळत असे. आता रेल्वेनं काही ठराविक रेल्वे स्थानकांच्या फलाट तिकिटांच्या दरात ५० रूपये वाढ केली आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण या रेल्वे स्थानकांच्या फलाट दरात वाढ केली आहे. ही तिकिट दरवाढ १५ जून पर्यंत लागू राहणार आहे. ठाणे, मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या करोना रूग्णांच्या वाढीमुळे रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading