ज्या माजी सैनिकांना निवृत्ती वेतन मिळत नसेल अशा माजी सैनिकांनी जिल्हा सैनिकी कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.ठाणे आणि पालघर जिल्हयातील सर्व माजी सैनिकांना, माजी सैनिक विधवांना आवाहन करण्यात येते की, ज्या माजी सैनिकांनी 1962, 1965 आणि 1971 च्या युध्दात भाग घेतलेला आहे आणि ज्यांना विविध पदके प्राप्त झालेल्याची नोंद सेवा पुस्तकात आहे तसंच ज्यांना निवृत्ती वेतन मिळत नाही. अशा सर्व माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कार्यालय येथे संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयानं केलं आहे. विविध पदकं प्राप्त झालेल्या माजी सैनिकांनी कार्यालयाशी त्वरित कार्यालयीन वेळेत संपूर्ण कागदपत्रांसहित संपर्क साधावा,असे आवाहन ठाणे पालघर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजल जाधव यांनी केले आहे.