भारतीय हवामान खात्यानं मेघगर्जनेसह जोरदार अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोकण विभागात येत्या रविवार पर्यंत हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किना-याला कायर या चक्रीवादळाचा धोका आहे. यामुळे सध्या पाऊस तिकडे खेचला गेला आहे. उद्या कोकणपट्टीत मोठ्या पावसाचा अंदाज देण्यात आला असून सहलीसाठी पुढील ८ दिवस कोकण, गोवा, गोकर्ण, मुंबई या ठिकाणी कुणीही जाऊ नये असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. २६ ते ३० ऑक्टोबर पर्यंत चक्रीवादळ पूर्ण प्रभावात असणार आहे. दमणपासून मंगलोरपर्यंत सागर किनारी राहणा-या सर्व नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कारण हे तुफान खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतं. शुक्रवारपर्यंत पावसाचं प्रमाण कमी होईल पण त्यानंतर चक्रीवादळानुसार पावसाची तीव्रता अतिभयानक आणि ढगफुटी असू शकेल. येत्या ३१ तारखेपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.