यंदा गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. जिल्ह्यामध्ये एक लाख चाळीस हजाराहून अधिक घरगुती गणपतीची तर दीड हजाराहून अधिक सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे. गेले दोन वर्ष करोना मुळे सर्वच उत्सवांवर निर्बंध होते त्यामुळे दोन वर्ष गणेशोत्सव हवा तसा साजरा करता आला नव्हता. मात्र यंदा शिंदे – फडणवीस सरकारने सर्व निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. पोलिसांनीही गणेशोत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता कडे कोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.