हवामान विभागाने आजपासून पुढील चार दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरूवात केली असून हवामान विभागानं ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ५ ते ९ जुलै या दरम्यान जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.