ठाणे जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात सरासरी १६१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल आणि आज जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली मात्र दुपारनंतर पावसानं काहीशी विश्रांती घेतली. ठाण्यात ३७७ मिलीमीटर, कल्याण १९२ मिलीमीटर, मुरबाड ५२, उल्हासनगर १६७, अंबरनाथ १३८, भिवंडी १४० तर शहापूरमध्ये ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.