जिल्ह्यात कोरोनाचे ७५९ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १२ हजार १८० अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ८०१ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १६८ नवे रूग्ण आढळले. तर एकही मृत्यू नाही. सध्या ३ हजार ४१० रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार ११७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १४५ नवे रूग्ण तर २ जणांचा मृत्यू झाला. सध्या ३ हजार ४३८ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९२८ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज २६५ नवे रूग्ण २ मृत्यू तर ३ हजार ६२३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार २४ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ३४ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ३९७ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३९५ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ४० रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या ३३२ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६५४ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज २३ रूग्ण, ० मृत्यू, सध्या ६७ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७९ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये २६ नवे रूग्ण, १ मृत्यू, सध्या १८४ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५७५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १३ रूग्ण, ० मृत्यू तर १५२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३८२ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये ४५ नवे रूग्ण मिळाले तर ० मृत्यू, सध्या ५७७ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २४८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.