जिल्ह्यात काल १ हजार ४८४ नवीन कोरोना ग्रस्त सापडले तर ४४ जणांचा मृत्यू झाला

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून काल १ हजार ४८४ नवे कोरोना बाधित रूग्ण सापडले त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ३३ हजार ३२४ झाली आहे. काल दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू झाला त्यामुळे मृतांची संख्या १ हजार ४६ झाली आहे. काल कल्याण-डोंबिवलीमध्ये ४६२ नवे रूग्ण तर ७ जणांचा मृत्यू झाला. ठाणे २६६ रूग्ण तर १५ जणं दगावले, नवी मुंबईत १७८ कोरोनाग्रस्त तर ४ जणांचा मृत्यू, भिवंडी ८२ नवीन रूग्ण तर ७ जणांचा मृत्यू, मीरा-भाईंदर १६१ नवीन रूग्ण तर तिघांचा मृत्यू, उल्हासनगर १४८ कोरोना बाधित सापडले आणि ३ जणांचा मृत्यू, अंबरनाथ ५४ रूग्ण तर ३ मृत्यू, बदलापूरमध्ये ३२ नवीन रूग्ण मिळाले तर ठाणे ग्रामीण क्षेत्रात १०१ नवीन रूग्ण तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूणच जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading