जिल्ह्यात काल कोरोनाचे १ हजार ४०६ नवे रूग्ण

जिल्ह्यात काल कोरोनाचे १ हजार ४०६ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२ हजार ३५५ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ३ हजार ४८९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ५ हजार ६९४ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण १ लाख २१ हजार ५३८ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ६६२ रूग्ण उपचार घेत असून २३ हजार २५ कोरोना रूग्ण बरे झाले तर ८२६ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ३ हजार २१२ रूग्ण उपचार घेत असून २४ हजार ४५३ बरे झाले तर ६०९ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ४४८ रूग्ण असून २१ हजार ३६० बरे झाले तर ५७६ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ४२६ रूग्ण उपचार घेत असून १० हजार ४८६ कोरोनातून बरे झाले तर ४१९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ३८९ रूग्ण असून ७ हजार ११० बरे झाले तर २२४ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये १४७ रूग्ण उपचार घेत असून ३ हजार ७३८ कोरोनातून बरे झाले तर २८३ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ३३१ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ४ हजार ३८६ बरे झाले तर १८२ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये २५९ रूग्ण असून ३ हजार ७१५ कोरोनामुक्त झाले तर ७१ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ४८१ रूग्ण असून ७ हजार ४२१ बरे झाले तर २९९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading