जिल्ह्यात आज १ हजार ३४५ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ३० हजारावर गेली आहे. दिवसेंदिवस वाढणा-या कोरोनाच्या संसर्गामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आज दिवसभरात ३८ जणांचा मृत्यू झाला तर आत्तापर्यंत ९८५ जणांचा कोरोनाने जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. ठाण्यात आज ३४१ नवीन रूग्ण तर १४ जणांचा मृत्यू, कल्याण-डोंबिवली ३६९ नवे रूग्ण तर ६ दगावले, नवी मुंबई १९७ कोरोना रूग्ण तर ४ मृत्यू, भिवंडीत ५० कोरोना बाधित तर तिघांचा मृत्यू, मीरा-भाईंदरमध्ये ११६ नवे रूग्ण तर ४ जणांचा मृत्यू, उल्हासनगर १०१ नवीन रूग्ण तर दोघांचा मृत्यू, अंबरनाथ ४५ नवे रूग्ण तर दोन मृत्यू, बदलापूरमध्ये ३५ कोरोनाग्रस्त मिळाले तर ठाणे ग्रामीणमध्ये आज ९१ नवे रूग्ण तर तिघांचा मृत्यू झाला.