जिल्ह्यात आज कोरोनाचे ४८१ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत १० हजार ८९२ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ९६ नवे रूग्ण सापडले तर १ मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ४८ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ८७ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ६३१ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज १४० नवे रूग्ण ४ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ७९५ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ५२ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३४४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १३ नवे रूग्ण, ३ मृत्यू, तर आत्तापर्यंत ५३८ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ४ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४६६ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ८ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ५२२ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज २९ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३५० जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ५२ नवे रूग्ण सापडले तर २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार १९८ जणांचा मृत्यू झाला आहे.