जिल्ह्यात आज कोरोनाचे ४३५ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे ४३५ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत १० हजार ८८० जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ७९ नवे रूग्ण सापडले तर १ मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ४७ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज १२२ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ६३० जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ८६ नवे रूग्ण २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ७९१ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ५६ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३४४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १४ नवे रूग्ण, २ मृत्यू, तर आत्तापर्यंत ५३५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४६६ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये १५ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ५२१ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज २१ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३५० जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ३९ नवे रूग्ण सापडले तर १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार १९६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading