जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३ बाधित रुग्णापैकी २ रुग्ण हे वैदयकीय चाचण्या नंतर निगेटिव्ह

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३ बाधित रुग्णापैकी २ रुग्ण हे वैदयकीय चाचण्या नंतर निगेटिव्ह आल्याने स्वगृही परतले आहेत. तर एकाचा वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे. ग्रामीण भागात परदेश आणि परराज्यातून १९८ नागरिक आले होते. त्यापैकी १८६ होम कॉरंटाइन करण्यात आले होते, तर १० नागरिकांना कॉरंटाइन कक्षात ठेवण्यात आले होते. त्यापैकी १३८ नागरिकांचा १४ दिवसाचा कॉरंटाइन पिरियड पूर्ण झाला आहे. त्यामुळं सध्यस्थिती आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ५९ नागरिक अलगीकरन असून त्यांच्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाची टीम संपर्कात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading