जिल्हाधिका-यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरूवात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था अंतर्गत समतादूत प्रकल्पाद्वारे जागतिक पर्यावरण दिना निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले. जागे अभावी वृक्ष भेट स्वरुपात देण्यात आले. वृक्षारोपण पंधरवडा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र मध्ये 5 जून ते 20 जून या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे प्राणवायूची जाणवत असलेली कमतरत्ता तसेच वाढते प्रदुषण पाहता पर्यावरणाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यात समतादूतांमार्फत कडूलिंब, चिंच, वड, पिंपळ अश्या मोठ्या प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात येत आहे. या पंधरवाड्यात महाराष्ट्रात एकूण 50 हजार झाडे लावण्याचा बार्टी चा मानस आहे. समतादूतांमार्फत आतापर्यंत ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास 152 वृक्षारोपण करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading