जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्याकरिता जनजागृती रथ तयार करण्यात आला आहे. या रथाचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या जनजागृती रथाच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेबाबत घ्यावयाची खबरदारी तसंच कोरोना आजाराच्या अनुषंगाने प्रबोधन करणारी माहिती चलचित्राद्वारे दाखवण्यात येणार आहे. या रथाच्या माध्यमातून कोरोना विषाणूबद्दल असणारे समाजातील गैरसमज दूर होणार असून जनतेनं काय खबरदारी घ्यावी हा संदेश पोचवला जाणार आहे.