ग्रामीण भागातील अंबरनाथ, कल्याण, शहापुर, भिवंडी, मुरबाड तालुक्यात तसेच बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम येत्या रविवारी राबवण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून ५ वर्षापर्यंतच्या बालकांचे लसीकरण करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांनी केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाच तालुक्यातील ५ वर्षापर्यंतच्या १ लाख ३७ हजार बालकांना तसेच बदलापुर आणि अंबरनाथ क्षेत्रातील एकुण ६७ हजार ७२९ बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. या मोहिमेत ग्रामिण आणि बदलापुर अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात एकुण १८३१ बुथवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी ६२१८ कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे. बुथवर लसीकरण केल्यानंतर राहिलेल्या बालकांना कर्मचारी घरोघरी जाऊन पुढील ३ ते ५ दिवसात पोलिओचे लसीकरण करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.