जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली असून याबाबत तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. जिल्हयातील सर्व 6 महानगरपालिका, 2 नगर परिषदा, 2 नगरपंचायती तसेच ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेने आपापल्या कार्यक्षेत्रातील कोरोना प्रादुर्भावग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन जिल्हयातील क्षेत्र सीमांकित करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी-निजामपूर महापालिकेचे संपूर्ण क्षेत्र, अंबरनाथ आणि कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेचे संपूर्ण क्षेत्र, शहापूर आणि मुरबाड नगरपंचायतीचे संपूर्ण क्षेत्र तसंच ठाणे जिल्हा परिषदेचे संपूर्ण क्षेत्र ही प्रतिबंधित क्षेत्र असणार आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊन आदेशामध्ये नमूद केलेल्या सवलती लागु राहणार नाहीत. प्रतिबंधात्मक सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्याची सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.