जिलानी इमारत दुर्घटनेनंतर आज चौथ्या दिवशी शोधकार्य थांबवलं

जिलानी इमारत दुर्घटनेनंतर आज चौथ्या दिवशी शोधकार्य थांबवण्यात आलं आहे. सोमवारी पहाटे भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनाग्रस्त झाली होती. गेले चार दिवस या इमारतीत दुर्घटनाग्रस्त झालेल्यांच्या बचावाचं कार्य सुरू होतं. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास हे बचावकार्य बंद करण्यात आलं. या दुर्घटनेत अद्याप एका दोन वर्षीय बालकाचा शोध लागला नसल्याची तक्रार रहिवाशांनी केल्यामुळं पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत ४० जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. आज या दुर्घटनेबद्दल ठाणे पोलीस आणि अग्निशमन दलातर्फे शोक व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading