छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली आणि अलौकिक वारशाची महती, त्यांचे कार्य, नीती, चरित्र, विचार आणि कार्यकुशलतेची जनसामान्यांना, विशेष करून विद्यार्थ्यांना, तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपक्रमाचा महत्वपूर्ण भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत “महानाट्य” या कार्यक्रमाचे सलग 3 दिवस विनामूल्य सादरीकरण होणार आहे. जिल्ह्यामध्ये 22 ते 24 मार्च या तीन दिवसाच्या कालावधीत रोज सायंकाळी 6.30 ते 9.30 या वेळेत ढोकाळी येथील हायलॅन्ड मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. आतापर्यंत 20 जिल्ह्यांमधील हजारो नागरिकांनी या महानाट्याचा आनंद अनुभवला आहे. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, नागरिकांसाठी विनामूल्य असलेल्या या “महानाट्य” कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.