घोडबंदर येथील विजय वाटिका इमारतीजवळ १५ पाणबगळे मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. या बगळ्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास पशु संवर्धन विभागाकडून सुरू आहे. वाघबीळ येथील विजयनगरी भागात एक छोटा तलाव आहे. या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बगळे येत असतात. काल सकाळी फिरायला बाहेर पडले असताना रस्त्याच्या कडेला त्यांना हे बगळे मृतावस्थेत आढळले. त्यांनी याची माहिती महापालिकेला दिली. महापालिका आणि पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचा-यांनी या बगळ्यांची पाहणी केली. यापैकी काही बगळ्यांचे मृतदेह चिरडलेले आणि खराब अवस्थेत होते. बगळ्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठवले असून प्राथमिक अंदाजानुसार हे मृत्यू बर्ड फ्लूनं झाले नसल्याचं सांगितलं जातं. सध्या काही ठिकाणी बर्ड फ्लूचं वातावरण असून त्यामुळं काहीशी घबराट निर्माण झाली आहे. लवकरच या बगळ्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल असं सांगितलं जात आहे.