जून महिन्यात दडी मारलेल्या पावसानं जुलै महिन्यात चांगली हजेरी लावल्याचं दिसत आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यामध्ये सरासरी ७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे १३० मिलीमीटर तर शहापूरमध्ये सर्वात कमी म्हणजे ३८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे तालुक्यात ६३, कल्याणमध्ये ६७, मुरबाड ५१, अंबरनाथ ७७ तर भिवंडीमध्ये ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे शहरातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. ठाण्यामध्ये गेल्या २४ तासात ७० मिलीमीटर पाऊस झाला आहे.