गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणांमध्ये खूपच कमी पाणी साठा

काल दिवसभर पावसाच्या संततधारेनंतर आज पावसानं काहीशी विश्रांती घेतली. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या पाणी पातळीत आता थोडी वाढ होत असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणांच्या पाण्याची पातळी खूपच कमी असल्याचं दिसत आहे. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात ४९३ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. म्हणजे धरणात ५२ टक्के पाणीसाठा आहे. तर गेल्यावर्षी आत्तापर्यंत ८५ टक्के धरण भरलं होतं. बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ३३८ दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात १६२ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. म्हणजे धरणात ४८ टक्के पाणी साठा आहे. तर आत्तापर्यंत गेल्यावर्षी ९६ टक्के धरण भरलं होतं. मध्य वैतरणा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १९३ दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात ६४ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. म्हणजे अवघा ३३ टक्के पाण्याचा साठा आहे तर गेल्यावर्षी आत्तापर्यंत ९७ टक्के धरण भरलं होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading