गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही ठिकाणी ध्वजसंचलन करण्यात आलं. साधारणपणे कोणत्याही सण-उत्सवापूर्वी सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याकरिता आणि पोलीसांचं अस्तित्व समोर यावं यासाठी संवेदनशील भागातून ध्वज संचलन केलं जातं. कालही भिवंडीच्या काही भागात असं ध्वज संचलन करण्यात आलं. कोनगाव, दुर्गाडी अशा ठिकाणी हे संचलन करण्यात आलं.