गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाणाऱ्या तळीरामांवर वन विभागाचे लक्ष

गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाणाऱ्या तळीरामांवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवल आहे. वनात जाणाऱ्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला असून वनात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. येऊर मध्ये असलेल्या सर्व प्रवेशाच्या ठिकाणी सहा तुकड्यांमध्ये ४२ कर्मचाऱ्यांचा पहारा ठेवण्यात आला आहे.आज गटारी (दर्श) अमावस्या असल्याने तळीराम आणि मांसाहार करणाऱ्यांच्या सर्वत्र पार्ट्या होत असताना येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मात्र असे दृश्य दिसून आले नाही. पावसाचा मोसम आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे वन असल्याने या ठिकाणी पार्ट्या करण्याची योजना अनेक तरुण आणि तळीरामांनी आखल्या होत्या. मात्र वन वन विभाग आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे त्यांना पार्ट्यांचा बेत पूर्ण करता आला नाही. ठाणे पोलिसांनी येऊरच्या मानवी वसाहतींमध्ये नाक्यांनाक्यावर चोख बंदोबस्त ठेवला होता. तर वन विभागात जाणाऱ्या पॉइंटवर वन विभागाने ६ तुकड्या बनवून ४२ कर्मचारी-अधिकाऱ्यांमार्फत बंदोबस्त ठेवला होता. एकालाही वनात जाऊ दिले जात नव्हते. त्यामुळे आज कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. वनात जाण्यास मनाई असतानाही अनेक उत्साही तरुण-तरुणी आतमध्ये लांबवर जातात. आतमध्ये वन्य प्राणी असल्याने त्यांच्या जीविताशी धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून विशेष खबरदारी घेतल्याचे वन विभाग अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading