आज आषाढी एकादशीनिमित्त ठाण्यातील विठ्ठल मंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. यावेळी कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी इतिहासात पहिल्यांदाच होऊ शकली नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरंही भाविकांसाठी बंद असल्यानं लोकांनी घरातच उपवास आणि पूजा करून आषाढी एकादशी साजरी केली मात्र भक्तांची नेहमीच आस असलेला विठूराया मात्र कोरोनामुळे भक्तांविना मंदिरात पोरकाच राहिला.