कोणत्याही देशाला प्रगती करायची असेल तर वैज्ञानिक संशोधनाला महत्व द्यावंच लागेल. संशोधनामधली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल असं प्रतिपादन उद्योजक अशोक गोगटे यांनी व्यक्त केलं. मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्याचा समारोप काल झाला त्यावेळी ते बोलत होते. कोणत्याही स्पर्धेत भाग घेणं हे महत्वाचं असतं. या स्पर्धेतून मिळालेला अनुभव विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोगी पडेल. या समारोपास दा कृ सोमण, दिलीप हेर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी आलेल्या १०० प्रकल्पातून ५० प्रकल्पांची निवड करण्यात आली.