कोकण मराठी साहित्य परिषदेच्या २४ मार्च रोजीच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व शाखांतर्फे ग्रंथ व्यवहाराशी संलग्न असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या घरी जाऊन सत्कार केला जाणार आहे. तर ठाणे शहरातर्फे २४ मार्च रोजीच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुरस्कार प्राप्त लेखकांचा सन्मान करण्यात येणार आहे. कविता राजधानी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त कवी डॉ. महेश केळुस्कर आणि कोकण साहित्य भूषण पुरस्कार प्राप्त डॉ. आनंद देशमुख यांचा सत्कार केला जाणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ६० शाखा असून जिल्ह्यामध्ये ६ शाखा कार्यरत आहेत. या सर्व शाखांतर्फे स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्तानं होणा-या कार्यक्रमात ८ लेखक, कवी यांचा सन्मान वेगळ्या पध्दतीनं होणार आहे. समाजातील केंद्रबिंदू असलेल्या पोलीस शिपाई, सैनिक, शेतकरी, शिक्षक अशा समाजघटकांच्या हस्ते हा सन्मान केला जाणार आहे.