केंद्रीय शालेय शिक्षण मंडळाच्या शालांत परीक्षेच्या गुणवत्ता यादीत ठाण्यातील दोन विद्यार्थी चमकले आहेत. काल केंद्रीय शालेय शिक्षण मंडळाच्या शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या निकालाच्या राष्ट्रीय यादीत राज्यातील ३ मुलांनी स्थान मिळवलं असून त्यांना ५०० पैकी ४९७ गुण मिळाले आहेत. न्यू होरायझन स्कूलचा आद्रीदास आणि रिलायन्स फौंडेशन स्कूलची धरती मेहता हे या यादीत झळकले आहेत. दासचं हिंदी कच्चं असल्यामुळं ३ गुण गमवावे लागल्याचं त्याचं म्हणणं आहे. पुढे जाऊन त्याला नासामध्ये शिक्षण घ्यायचं आहे. धरती मेहतानं पहिल्या दिवसापासूनच अभ्यास केला. तिला इंग्लिशमध्ये ९७ गुण मिळाल्यामुळे तिचे तीन गुण कमी झाले. धरतीला आयआयटीमध्ये जाऊन अभियंता व्हायची इच्छा आहे.