गेल्या ४ वर्षात या शहरासाठी सतत काहीतरी करायचा प्रयत्न केला असला तरी अजूनही काही करायचे बाकी राहून गेले असल्याची कबुली महापालिका आयुक्तांनी दिली. महापालिका आयुक्त म्हणून ४ वर्षांचा टप्पा पूर्ण करताना नवीन वर्षात नवीन कामांची आखणी करण्यासाठी आयोजित एका बैठकीत महापालिका आयुक्तांनी ही कबुली दिली. गेल्या ४ वर्षात लोकहिताच्या शहराच्या विकासाच्या विविध योजना हाती घेतल्या. त्यातील काही योजना प्रगतीपथावर आहेत. काही सुरू झाल्या पण त्या संथ गतीनं सुरू आहेत. काही योजना अद्यापही सुरू झाल्या नसतील, त्या योजना प्रामाणिकपणे या वर्षात सुरू करता येतील का, किंवा करताच येणार नसतील तर तसे मान्य करून त्याऐवजी नवीन काही योजना करता येतील का, याचा विचार करता येईल असं पालिका आयुक्तांनी कबूल केले. आपली निष्ठा नागरिकांच्या प्रती असल्याचं मान्य करत यापुढे सामाजिक आणि लोकहिताच्या कामांना प्राधान्य देण्याचा सूचना देऊन हे विषय फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी पाठवण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी अधिका-यांना दिल्या.