कालच्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात १ टक्क्यानं वाढ

गेले दोन दिवस ज्याप्रमाणे शहरामध्ये पाऊस कोसळत आहे त्या तुलनेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत नसला तरी काल धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात १ टक्क्यानं वाढ झाली आहे. सोमवारी भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८ तर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११ मिलीमीटर पाऊस झाला होता. तर काल भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८८ मिलीमीटर आणि बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात १ टक्का वाढ झाली आहे. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर असून सध्या धरणामध्ये ५१७ दशलक्ष घनमीटर म्हणजे ५५ टक्के पाण्याचा साठा आहे. गेल्यावर्षी याच काळात तो ८९ टक्के होता. तीच परिस्थिती बारवीचीही असून बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ३३९ दशलक्ष घनमीटर झाली असून सध्या धरणामध्ये १७० दशलक्ष घनमीटर म्हणजे ५० टक्के पाणी साठा आहे. गेल्यावर्षी याच काळात तो ९८ टक्के होता. यंदा पावसानं काहीशी दडी मारली असल्यामुळं धरणातील पाणीसाठा अजून निम्म्यावरच आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading