समाजातील विविध घटना संवेदनशील कवी टिपत असतो. या घटना टिपत असताना कवी मनाला ज्या वेदना होतात, त्याच्या ज्या सृजनशील संवेदना असतात त्या वेदनेच्या मूळाशी कवितेचा जन्म होतो असं प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी छंद-आनंद या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी केलं. कवी शिवराम उर्फ महेश टक्के यांच्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते. कवी महेश टक्के हा ज्ञानसाधना महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याने महाविद्यालयात किती टक्के मिळवले याची कल्पना नाही. पण त्याचा छंद आनंद हा काव्यसंग्रह १०० टक्के यश मिळवणार असं बागवे यांनी सांगितलं. महापालिकेतील कर्मचारी सुध्दा आपले कामकाज सांभाळून आपली कला जोपासत आहेत. ही खरोखर आनंदाची बाब असल्याचं सांगत महापौरांनी शिवराम टक्के यांना शुभेच्छा दिल्या.