ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे असून कांदळवनावर अतिक्रमण झाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर कळवा पुलाखाली कांदळवनात बांधलेल्या अनाधिकृत ५७ झोपड्यांवर आज निष्कासानाची कारवाई करण्यात आली.