कळवा आणि मुंब्र्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व जलवाहिनीचे तातडीचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी ७.३० ते रात्री १२:०० वाजेपर्यंत ठाणे महापालिकेतील दिवा प्रभाग समिती आणि मुंब्रा प्रभाग समितीमधील मुंब्रा बायपास पासुन मुंब्रा फायरब्रिगेड पर्यंत (किस्मत कॉलनी, चांद नगर, एम. एम. व्हॅली, अमृत नगर, अल्मास कॉलनी) तसेच कळवा प्रभाग समिती मधील काही भाग आणि कोलशेत मधील काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहील. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.