एसटीने ४ लाखांहून अधिक मजुरांना सोडले त्यांच्या मूळगावी

महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून आत्तापर्यंत ४ लाखाहून अधिक मजुरांना त्यांच्या मूळगावी सोडण्यात आलं. ९ मे पासून आतापर्यंत ३६ हजार ४३२ बसेसद्वारे सुमारे ४ लाख ३३ हजार ५०९ स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत धावून स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास एसटीची मदत झाली आहे. तसेच इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना राज्यात आणण्याचेही काम केले जात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading