भुकेल्यापोटी उन्हातान्हात चालत प्रवास करणा-या गोरगरिबांना आमदार संजय केळकर यांच्या मार्फत अन्नदान करण्यात येत आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य जनता संकटात सापडली असून अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गोरगरिब, मजूर वर्ग आपल्या गावाकडे पायपीट करत उन्हातान्हातून जात आहे. अशा गोरगरिबांना आमदार संजय केळकर साहेब यांच्या ‘संजय फाऊंडेशनच्या मार्फत मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्त्यालगत चालत जाणाऱ्या पुरुष, महिला आणि लहान मुले अशा शेकडो गरजूना अन्नदान करण्यात येत आहे.